Archive

Archive for August 10, 2011

चारोळी

चारोळी

प्रश्न असा पडतो मला की
मी तुला कळलो का नाही?
तुझ्यासाठी पेटल्यावर मग
मरणानंतर जळलो का नाही?

जाऊदे आता दु:ख तरी
कशा कशाचं करून घ्यायचं
रडत रडत जगण्यापेक्षा
हसत हसत मरून घ्यायचं

जाळल्या ज्या कविता त्यांनी
जिवंत कविंनी केल्यावर
जिवंत केल्या त्या कविता
त्यांनी कविला जाळल्यावर

— मयुरेश कुलकर्णी